
election commission team in Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच पथक राज्यात दाखल झालं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील चौदा जणांचे पथक गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाने शुक्रवारी राज्यातील निवडणुकीसाठी तयारीचा आढावा घेतला. राज्यातील विविध यंत्रणेशी संवाद देखील साधण्यात आला. दरम्यान, राज्यात १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मतदान व २० नोव्हेंबरपर्यंत निकाल असा निवडणूक कार्यकम जाहीर होण्याची शक्यता आहे. या साठी आज राज्यात आलेले पथक हे संध्याकाळी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.