
“ईडीमुळे मी पवारसाहेबांची साथ सोडली नाही. मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची कुठलीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे विनाकारण अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले. डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा प्रयत्न झाल्यास आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यांतील ६५ बंधारे पाण्याअभावी कोरडे पडण्याचा धोका हेाता. यामुळे शेतीमुळे आलेली समृद्धी धोक्यात येईल. पाच साखर कारखाने धोक्यात येतील. या भागातील जनतेचा विचार करूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याची निर्णय घेतला”, असे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.





