
सूरज सिंह ठाकूर यांनी लिहिले आहे की, प्रवासी अजूनही विमानातच बसले आहेत. गेल्या ९ तासांपासून आम्ही या विमानात अडकलो आहे. भारत जोडो न्याय यात्रेसाठी मी मणिपूर (इंफाळ) येथून रवाना झालो असून आता मी गुवाहाटीला कधी पोहोचणार याची वाट पाहत आहे. विमान ढाक्याला का वळवण्यात आले हे स्पष्ट झालेले नाही. इंडिगोने या प्रकरणी अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.







