
मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ११ जुलै २००६ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारी पक्ष त्याच्यावरील खटला सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. १९ वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेत १८० हून अधिक लोक मारले गेले होते.