
Mumbai police : राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी उघडकीस येत आहे. सायबर चोरट्यांनी फसवणुकीसाठी विविध प्रकारच्या क्लूप्त्या वापरत असल्याचं देखील पुढं आलं आहे. सायबर चोरट्यांनी आता फसणवुकीचा नाव फंडा वापरत आहेत. अनेक नागरिकांना आयुक्तांच्या नावे सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच मेसेज व फोन करून कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून अटक करण्याची धमकी दिली जाते. असे कॉल आल्यास अथवा मेसेजेस आल्यास न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधा, असे अवाहन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केले आहे.