
सावनीने आखला नवा डाव
सावनीला मिहिका आणि मिहिरच्या साखरपुड्याविषयी कळते. तिला धक्का बसतो. ती हा साखरपुडा कसा होतो हेच बघते असे हर्षवर्धनला बोलते. त्यानंतर ती मिहिर आणि मिहिकाच्या साखरपुड्याला पोहोचते. गोखले कुटुंबीय तिला तेथून जाण्यास सांगतात. पण ती काही जायला तयार नाही. शेवटी सावनी सर्वांना सत्य सांगते. मिहिर हा सावनीचा भाऊ आहे. हे कळताच गोखले कुटुंबीयांना धक्का बसतो.







