
- Marathi News
- Opinion
- Minhaj Merchant’s Column, How Can Gold Be Used More Productively In The Economy?, Indians Are Very Attracted To Gold
5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आज भारतीय कुटुंबांकडे जगातील दहा सर्वात मोठ्यामध्यवर्ती बँकांच्या सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त सोनेआहे – अमेरिका, जर्मनी, रशिया, फ्रान्स, चीन, इटली,स्वित्झर्लंड, जपान, तुर्की व खुद्द भारत! भारतीयघरांमध्ये सुमारे २५,००० टन सोने साठवलेले आहे. हेअमेरिकन सरकारच्या सोन्याच्या साठ्याच्या (८,१३३टन) तिप्पट व रिझर्व्ह बँकेच्या (८७९ टन) सोन्याच्यासाठ्याच्या जवळजवळ ३० पट आहे.
आजच्या भावानुसार भारतात देशांतर्गत सोन्याचीकिंमत किती असेल? सोन्याचे भाव बऱ्याच काळापासूनवाढत आहेत, परंतु गेल्या काही वर्षांत भू-राजकीयअस्थिरतेमुळे त्यात वाढ झाली आहे. सध्याच्या दर तोळा(१० ग्रॅम) सुमारे १ लाख रुपये (१,२०० डाॅलर) याभावानुसार भारतीय घरांमध्ये साठवलेल्या २५,००० टनसोन्याचे मूल्य सुमारे ३ ट्रिलियन डॉलर्स इतके आहे. हेभारताच्या २०२५ च्या ४.१९ ट्रिलियन डॉलर्सच्याजीडीपीच्या सुमारे ७५ टक्के आहे.
असा अंदाज आहे की, यापैकी एकट्या भारतीय महिलांकडे २४,००० टनांपेक्षा जास्त सोने आहे. हेअमेरिका, जर्मनी (३,३०० टन), इटली (२,४५० टन), फ्रान्स (२,४०० टन) आणि रशिया (१,९०० टन) या देशांच्या मध्यवर्ती बँकांकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त आहे. ऑक्सफर्ड गोल्ड ग्रुपच्या अहवालानुसार, जगातील एकूण सोन्यापैकी ११ टक्केसोने भारतीय महिलांकडे आहे.
भारतीयांच्या सोन्यावरील या अफाट प्रेमामागीलकारण काय आहे? ही एक सुरक्षित आणि स्थिरगुंतवणूक मानली जाते. गेल्या २५ वर्षांतच सोन्याचा भाव४,००० रु. प्रति १० ग्रॅमवरून सुमारे १,००,००० रु. प्रति १०ग्रॅम इतका वाढला – २५ वर्षांत २५ पट वाढ. चक्रवाढआधारावर सोन्याचे मूल्य दरवर्षी सुमारे १४ टक्क्यांनीवाढले आहे आणि ते दर पाच वर्षांनी दुप्पट होत आहे.त्या तुलनेत २००० ते २०२५ दरम्यान बीएसई सेन्सेक्स६,००० वरून ८०,००० पेक्षा जास्त अंकांपर्यंत वाढलाआहे – २५ वर्षांत जवळजवळ १४ पट वाढ. हे १२ टक्केचक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) दर्शवते.
सोने दीर्घकाळात इक्विटीपेक्षा चांगले कामगिरी करते.शेअरच्या तुलनेत सोन्याचे भाव कमी अस्थिर असतात.जगातील सर्वात रूढीवादी गुंतवणूकदारांपैकी एकअसलेल्या भारतीय महिलांना हे चांगलेच माहिती आहे.सोन्यामुळे भारतीय कुटुंबांना लग्नासाठी पैसे उभारण्यासआणि दिवाळखोरी टाळण्यास मदत झाली आहे. पण,आर्थिक सुरक्षेसाठी ठेवलेल्या मृत मालमत्तेपेक्षाभारताच्या अर्थव्यवस्थेत सोन्याचा वापर अधिकउत्पादकपणे कसा करता येईल? आरबीआयच्या सोनेगुंतवणूक योजनेला मर्यादित यश मिळाले आहे. सोनेसाठवण्याला पर्याय प्रदान करणे हे सॉवरिन गोल्ड बाँडचेउद्दिष्ट आहे. आरबीआयने म्हटल्याप्रमाणे सॉवरेन गोल्डबाँड हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे साठवणुकीचाधोका व खर्च कमी होतो. गुंतवणूकदारांना परिपक्वतेच्यावेळी सोन्याचे बाजार मूल्य व नियतकालिक व्याजयाची खात्री दिली जाते. सोन्याचा दागिने म्हणून वापरकरण्याच्या बाबतीतही सॉवरिन गोल्ड बाँड समस्यांपासूनमुक्त आहे. परंतु, भारतीयांत भौतिक सोन्याचे आकर्षणइतके तीव्र आहे की, सॉवरिन गोल्ड बाँड पूर्णपणेलोकप्रिय झालेले नाहीत.
२०२४-२५ मध्ये भारताने ५८.०१ अब्ज डॉलर्सचे सोनेआयात केले. तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशानेआयात शुल्क १५ वरून ६ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने२०२३-२४ मध्ये सोन्याची आयात २७ टक्क्यांनी वाढली.२०२४-२५ मध्ये भारताची एकूण व्यापारी तूट ९४.२६अब्जडा ॅलर होती. म्हणूनच २०२४-२५ मध्ये भारताची५८.०१ अब्ज डॉलर्सची सोन्याची आयात ही भारताच्याव्यापार तुटीचा एक प्रमुख घटक आहे. तथापि,भारताच्या आयात बिलातील सर्वात मोठा घटक कच्चेतेल आहे, ज्याने २०२४-२५ मध्ये १३३ अब्ज डॉलर्सचेयोगदान दिले.
सोन्याची आयात ही कच्च्या तेलाच्या आयातीपैकीनिम्मी आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे असलेपाहिजे. परंतु, दरवर्षी अधिकाधिक सोने खरेदीकरण्याची भारतीय कुटुंबांची अतृप्त भूक भारताचीव्यापारी तूट वाढवत आहे. सोन्याकडे असलेले आकर्षणकेवळ आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक आणिभावनिकही आहे. भारतीय महिलांकडे ३ ट्रिलियनडॉलर्स किमतीचे २४,००० टनांपेक्षा जास्त सोनेअसल्याने आणि गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी ५८ अब्जडॉलर्स किमतीचे अंदाजे ६०० टन सोने खरेदी केलेअसल्याने सोन्याच्या किमती तेजीत राहण्याची शक्यताआहे.