
देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे शरद पवार व उद्धव ठाकरेंची भाषा बोलत असल्याचे म्हटले होते. त्यातच, आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेनादरम्यान, जरांगे यांच्या विधानांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणीही विधानसभेत झाली. त्यानुसार, आता जरांगेंच्या आंदोलन चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात येणार आहे. जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी शरद पवार गट असल्याचा आरोप होत आहे. त्यातच, आमदार आशिष देशमुख यांनी जरांगेच्या राजकीय प्रवेशाचा दावा केला आहे.






