
मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून आवाज उठवणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जिथं त्रास दिला आहे, त्याला पाडून बदला घ्यायचा, अशी रोखठोक भूमिका घेत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्ज माघारी घेण्याचा ४ नोव्हेंबर (सोमवार) शेवटचा दिवस आहे. ठराविक जागांवर जरांगे यांनी उमेदवार उभे केले आहेत.







