
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर, मिहिर, मिहिका, सई ही सगळीच पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत. त्यामुळे या पात्रांच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. मिहिरचे लग्न मोडल्यामुळे त्याला धक्का बसला आहे. तो सागरकडे त्याचे मन मोकळे करत असते. दरम्यान, दोघांनी मद्यपान केले आणि ते मुक्ताने पकडले.








