भारतातील सर्वात श्रीमंत CEO, संपत्तीच्या बाबतीत सुंदर पिचाई,सत्या नडेलांच्या खूपच पुढे!

0
49
भारतातील सर्वात श्रीमंत CEO, संपत्तीच्या बाबतीत सुंदर पिचाई,सत्या नडेलांच्या खूपच पुढे!


Jayshree Ullal’s story: भारतातील सर्वात श्रीमंत CEO कोण? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या व्यक्ती संपत्तीच्या बाबतीत सुंदर पिचाई,सत्या नडेलांच्यादेखील खूपच पुढे आहेत. जयश्री उल्लाल असे त्यांचे नाव असून त्यांचा जन्म 1961 मध्ये लंडनमध्ये झाला पण त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण झाले. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या जयश्रींनी दिल्लीच्या कॉन्वेंट ऑफ जीसस अँड मेरी शाळेत शिकताना मेहनत आणि शिक्षणाला प्राधान्य दिले. त्याकाळी मुलींसाठी इंजिनिअरिंग सारखे क्षेत्र निवडणे आव्हानात्मक होते, तरीही त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची वाट निवडली आणि अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेतले. हे त्यांच्या धैर्याचे आणि महत्वाकांक्षेचे प्रतीक आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

करिअरची सुरुवात कशी झाली?

अमेरिकेत पोहोचल्यानंतर जयश्रींनी टेक क्षेत्रात महिलांची कमी संख्या पाहिली, पण त्यांनी याला संधी म्हणून स्वीकारले. त्यांनी फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर आणि एएमडी सारख्या कंपन्यांमध्ये काम करत कॉम्प्युटर चिप्सच्या निर्मितीचा अनुभव मिळवला. नंतर क्रेसेंडो कम्युनिकेशन्समध्ये मार्केटिंगच्या उपाध्यक्ष म्हणून काम केले. 1993 मध्ये सिस्कोने ही कंपनी विकत घेतली आणि जयश्रींच्या करिअरला खरी गती मिळाली.

सिस्कोमध्ये मिळाले यश 

सिस्कोमध्ये 15 वर्षे काम करताना जयश्रींनी नेटवर्किंग व्यवसायाला अब्जावधी डॉलर्सपर्यंत वाढवले. त्या सीनियर व्हाइस प्रेसिडेंट होऊन 15 अब्ज डॉलर्सच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळल्या. पण 2008 मध्ये त्यांनी सुरक्षित नोकरी सोडून अरिस्टा नेटवर्क्स नावाच्या छोट्या स्टार्टअपमध्ये सीईओ म्हणून प्रवेश केला. हा धाडसी निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचा पुरावा म्हणून आपण पाहू शकतो. 

अरिस्टा नेटवर्क्सची वाढ

अरिस्टा नेटवर्क्स क्लाउड नेटवर्किंगसाठी स्विच आणि राउटर बनवते, जे मोठ्या डेटा सेंटर्सना जोडण्याचे काम करते. जयश्रींच्या नेतृत्वात ही कंपनी छोट्या खोलीतून बाहेर पडली आणि 2014 मध्ये आयपीओ आणून शेअर बाजारात यशस्वी झाली. त्यांनी हार्डवेअरसोबत सॉफ्टवेअरवर भर दिला, ज्यामुळे गूगल, फेसबुक सारख्या कंपन्या ग्राहक झाल्या. आज अरिस्टा जगातील आघाडीची नेटवर्किंग कंपनी आहे.

संपत्तीची तुलना

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जयश्रींची एकूण संपत्ती 50170 कोटी रुपये आहे, जी मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला  यांची संपत्ती 9770 कोटी आणि गूगलचे सुंदर पिचाई यांची संपत्ती 5810 कोटी आहे. जयश्रींची संपत्ती यांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. ही संपत्ती त्यांच्या कंपनीतील शेअर्समधून आली आहे.

काय दिलाय संदेश?

जयश्री सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतात पण त्यांच्या बोलण्यात दिल्लीची साधेपणा आजही जाणवतो. यशाचा कोणताही शॉर्टकट नाही; फक्त मेहनत, विश्वास आणि योग्य वेळी जोखीम घेणे गरजेचे असल्याचे त्या सांगतात. भारतीय मूलाच्या व्यक्ती जगातील टेक क्षेत्रात कशा प्रकारे इतिहास घडवू शकतात, हे त्यांच्या कहाणीतून दिसून येतं.





Source link