
पहलगाममध्ये निःशस्त्र पर्यटकांच्या हत्येचा फटका आता पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवाद्यांना बसत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर घातक क्षेपणास्त्रे डागून चोख प्रत्युत्तर दिले आहे. २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील प्रत्येक नागरिकाचे रक्त उसळत आहे. दरम्यान, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय मुस्लिमांना केवळ १५ मिनिटांसाठी सत्ता देण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनच्या नेत्याने केली आहे.