बेरोजगारांना खूशखबर! रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी आता ITI बंधनकारक नाही! १० वी पास देखील करू शकणार अर्ज

0
2
बेरोजगारांना खूशखबर! रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी आता ITI बंधनकारक नाही! १० वी पास देखील करू शकणार अर्ज


RRB Group D Eligibility Criteria: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ग्रुप डी (लेव्हल -१) पदांच्या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रतेचे निकष शिथिल केले आहेत. नव्या निकषांनुसार आता दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सुद्धा  ग्रुप डी पदांच्या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ग्रुप डी भरतीसाठी आयटीआय डिप्लोमा यापुढे अनिवार्य राहणार नाही. यापूर्वी तांत्रिक विभागांसाठी अर्ज करण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आणि नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगकडून (एनसीव्हीटी) एनएसी किंवा आयटीआय डिप्लोमा असणे अनिवार्य होते. नॅक किंवा आयटीआय पदविका नसलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकत नव्हते.



Source link