
ठरलं तर मग
नेहमीप्रमाणे ‘ठरलं तर मग’ या मालिकेने टीआरपी शर्यतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या मालिकेला ६.८चे टीआरपी रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे. मधुभाऊंच्या केसवर आता लवकरच कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. सायली, अर्जुन आणि चैतन्य यांनी मिळून साक्षी-महिपत यांच्या विरोधातील सगळे पुरावे गोळा केले आहेत. आता हेच पुरावे सिद्ध करून ते मधुभाऊंना सुखरूप सोडवणार आहेत.







