
नैर्ऋत्य मोसमी वारे येत्या चार ते पाच दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, मान्सून जर वेळेपूर्वी केरळमध्ये दाखल झाला, तर २००९ नंतर भारतीय मुख्य भूमीवर मान्सून सर्वात लवकर दाखल होईल. हवामान खात्याने यापूर्वी २७ मेपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.