
बटालियनच्या एका जवानाने याच्या नामकरणाची कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही एखाद्या मिशनवर जातो किंवा परतत असतो तेव्हा आम्ही चामुंडा माता की जय असा नारा देत असतो. त्यांनी सांगितले की, त्यादिवशी आम्ही चामुंडा मातेचे नाव घेतले व बकऱ्याला मलेरियाची गोळी दिली. ही टॅबलेट खाताच बकरा एकदम ठीक झाला व आमच्या कॅम्पमध्ये राहू लागला. या बटालियनचे राजस्थानमधील अजमेर येथील चामुंडा देवी मंदिराशी खुपच जवळचे नाते आहे. जेव्हा बटालियन आपल्या विशेष वाहनाने एक कॅम्पमधून दुसऱ्या कॅम्पकडे जात असते तेव्हा हे बकरेही त्यांच्या खास वाहनांतून प्रवास करत असते.








