
Indurikar Maharaj : आपल्या अनोख्या किर्तन शैलीसाठी इंदुरीकर महाराज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. तरुण वर्गामध्ये महाराजांची प्रचंड क्रेझ आहे. आपल्या किर्तनातून समाजातील ज्वलंत विषयावर भाष्य करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. महिला वर्गावर केलेल्या टिप्पणीमुळे काही महिन्यापूर्वी इंदुरीकर महाराज चर्चेत आले होते. त्यांच्या किर्तनांमधून ते अनेकदा जनजागृती व प्रबोधनाचं कार्य करत असतात. त्यांचे अकोल्यात नुकतेच झालेले किर्तन राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. त्यात त्यांनी धर्मांचं भांडवल करु नका, गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका, असं म्हणत त्यांनी राजकारण्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.




