
‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत झळकलेली शुभम आणि कीर्तीची जोडी प्रेक्षकांना भरपूर आवडली होती. शुभम आणि कीर्तीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. शुभम हा एका लहान जो शहरातला मिठाईचे दुकान चालवणारा एक तरुण होता. तर, कीर्ती ही आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न मनाशी बाळगून पुढे प्रवास करणारी एक तरुणी होती. मात्र, नियतीच्या चक्रामुळे या दोघांचं लग्न होतं आणि कीर्तीला आपली सगळी स्वप्न सोडून घर संसार सांभाळावा लागतो. पुढे, आपल्या बायकोच्या मनात आयपीएस होण्याची इच्छा होती आणि तेच तिचं स्वप्न होतं, हे कळल्यानंतर शुभम कीर्तीला पाठिंबा देऊन, तिला अभ्यास करायला लावून एक पोलीस अधिकारी बनवतो. अशी या मालिकेची कथा होती.