
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचा संताप उफाळून आला आहे. संपूर्ण पाकिस्तान देशातून या हल्ल्याचा सूड घेण्याची भावना व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारही पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेत आहे. पण या प्रकरणामुळे आता राजकारणही तापले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.





