
राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाच्या अनावरण कार्यक्रमाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की, ४० वर्षांनंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले. अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल. अजित पवारांमुळे शेवटी ४० वर्षानंतर पवार साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जावं लागलं. आता तुतारी कुठे वाजते, कशी वाजते, किती वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच.