
दोन वर्षापूर्वी जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप –
पीडितेचा आरोप आहे की, वर्ष २०२२ मध्ये दुसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतर तिच्या ननंदेने तिला तापाच्या गोळी सांगून गर्भपाताच्या गोळ्या चारल्या होत्या. त्यामुळे तिचा गर्भपात झाला होता. गेल्या तीन जुलैच्या रात्री तिच्या पतीने, दीराने व सासू आणि ननंदेने तिला मारहाण केली होती. एसओ वनभूलपुरा नीरज भाकुनी यांनी सांगितले की, जुन्या आयपीसीनुसार हुंडाविरोधी कायदा आणि नवीन भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३५१ (२) आणि ८५ नुसार पीडितेचे पती, दीर, सासू व ननंदेसह सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.








