
जमशेदपूर, झारखंड येथे हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या आहेत. या अपघातात २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा अपघात राजखरस्वान आणि बडाबांबो दरम्यान पहाटे ३.४३ वाजता झाला. या अपघातानंतर या मार्गावरील हावडा टिटलागडसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयासोबतच टीएमएच, मेडिकल कॉलेज आणि जमशेदपूरच्या सदर हॉस्पिटललाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.







