
रांची हवामान केंद्राचे प्रभारी अभिषेक आनंद यांनी सांगितले की, जवळजवळ अर्धा झारखंड उष्णतेने होरपळला आहे. झारखंडमध्ये पुढील ४८ तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार झारखंडमधील तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. आयएमडीने केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने केरळच्या पलक्कड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.








