
यानंतर साक्षी घरी परतते, तेव्हा समोर सायली आणि अर्जुनला पाहून ती चकित होते. तर, साक्षीला समोर पाहून चैतन्य अर्जुन आणि सायलीला घरातून हाकलून देण्याचं नाटक करतो. चैतन्य साक्षीकडे बघून तिला म्हणतो की, ‘हे दोघे कल्पना आईचा निरोप घेऊन इकडे आले होते. आपल्या दोघांचा साखरपुडा झाला, आता लवकरात लवकर लग्न करावं, असं कल्पना आईचं मत आहे आणि कल्पना आईचा हाच निरोप घेऊन मुद्दाम हेच दोघे इथे आलेत. मी यांना केव्हापासून घराबाहेर काढायचा प्रयत्न करतोय’, असं बोलून तो दोघांनाही घरातून बाहेर हाकलून लावतो.








