
बिहारमध्ये एका नवऱ्याला चिकनच्या रश्श्यात मीठ जास्त झाल्याची तक्रार करणं चागलंच महागात पडलं आहे. या छोट्याशा तक्रारीवरून पत्नी व मेव्हुणीने त्याला बेदम मारहाण करत त्याला ठार केलं आहे. ही घटना पश्चिम चंपारण जिल्ह्यातील चौतरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हुआ गावात घडली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या बहिणीला अटक केली आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली जात आहे. दोघींनी पतीची काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून त्याची हत्या केली आहे.








