
सामान्यपणे वीज ग्राहकांची तक्रार असते की, वीज वापर कमी करूनही त्यांचे लाईट बिल अधिक येते. मात्र बिहार राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बगहा-२ परिसरातील हरका गावात लोकांच्या वेगळ्याच तक्रारी आल्या आहेत. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, या गावात काही असे लोक आहेत, ज्यांनी विजेचे कनेक्शनच घेतले नाही. मात्र त्यांच्या नावावर विजेचे बिल येत आहे.








