
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होऊन दोन दिवस झाले तरी खातेवाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. गृहमंत्रालयासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्याचबरोबर यावरून शिंदे नाराज असल्याचंही बोललं जात आहे. यासाठी त्यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याची भूमिका घेतली होती. मात्र, भाजपा पक्षश्रेष्ठीं व शिवसेना (शिंदे) आमदारांच्या दबावामुळे शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. आता खातेवाटप व गृहमंत्रालयाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.







