
नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील गोमांसाचे संकट अधिक गंभीर झाले आहे. याचे कारण म्हणजे गोरक्षकांच्या हल्ल्याची भीती. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गोवा मीट कॉम्प्लेक्स आणि कत्तलखान्याच्या माध्यमातून गोव्यातील जनतेला ‘स्वच्छ’ गोमांस पुरवठा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बीफ विक्रेत्यांवर गोरक्षकांनी रविवारी सायंकाळी हल्ला केला होता, त्यानंतर सोमवारी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली.