
काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात जवानांच्या वेशातील दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २५ पर्यटकांसह २६ जण ठार झाले. आता या हल्ल्याशी संबंधित अनेक नवे व्हिडिओ आणि दावे समोर येत आहेत, जे दहशतवाद्यांच्या कारस्थानाचा पर्दाफाश करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील एका कुटुंबाने दावा केला आहे की, २२ एप्रिलच्या घटनेच्या एक दिवस आधी म्हणजे २१ एप्रिल रोजी बैसारण खोऱ्यात दहशतवाद्यांनी त्यांच्या धर्माविषयी विचारणा केली होती.