
जमिनीचा मालकी हक्क सुनिश्चित केल्याने जमिनीवरून होणारे वाद कमी होण्याची शक्यता आहे. तसेच गावपातळीवरील विकास कामांचे नियोजन करणे देखील आता सोपे होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोराम, ओडिशा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील नागरिकांना स्वामित्व कार्ड वितरित करणार आहेत.