
दरम्यान, सिविल कोर्टात मुकीम खान व अन्य काही याचिकाकर्त्यांनी केस दाखल करत दावा केला होता की, ही जमीन कब्रस्तानची आहे. यावर १९७० पासून खटला सुरू आहे. त्यानंतर हा खटला १९९७ मध्ये बागपतकडे स्थानांतरित करण्यात आला. आता ५३ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल हिंदूंच्या बाजुने लागला आहे. हिंदू पक्षाच्या वकीलाने सांगतले की, आपल्या निकालात कोर्टाने म्हटले की, हे कोणतेही कब्रस्तान नव्हे तर लाक्षागृह आहे आणि हे महाभारत कालीन आहे. घटनास्थळी जे प्राचीन शिलालेख मिळाले आहेत, त्यातून हे स्पष्ट होते की, हे कब्रस्तान नाही.








