सांगली: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेनं देखील लक्षवेधी कामगिरी केली आहे. शिवसेना नेते तथा मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी भाजपला खोचक टोला लगावला. एका लुगडयाने कोण म्हातारे होत नाही, सत्ता स्थापनेसाठी भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर असते, असे म्हणत देसाई यांनी भाजपला डिवचलं. सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेवरुन भाजपला चांगलाच टोला लगावला. तसेच, जिल्हा परिषदेमध्ये (ZP) भाजपला पाठिंबा द्यायचा का नाही? याबाबत शिवसेनेचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, असेही शंभूराजेंनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या अगोदर मित्र पक्षांना डावलायचं आणि नंतर सत्ता स्थापन करताना सोबत असल्याचे सांगायचं ही भाजपची सोयस्कर भूमिका नेहमी असते. शिवसेनेची भूमिका ठरवणारे भाजप कोण ? जिल्हा परिषदेमध्ये पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश येतील त्या पद्धतीने आमचा पुढील निर्णय असणार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सांगलीमध्ये ते प्रसारमध्यमांशी बोलत होते.
एका लुगड्याने कोण म्हातारी होत नाही
एका लुगड्याने कोण म्हातारी होत नाही, निवडणुकीच्या अगोदर आणि त्यानंतर महापालिकेमध्ये भाजपने निर्णय घेतले. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करताना आम्ही जो निर्णय घ्यायचा तो घेऊ. सांगली जिल्ह्यात निवडून आलेल्या शिवसैनिकांशी चर्चा करून त्यांची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगितली जाईल. त्यानंतर शिंदे साहेब सांगतील तो निर्णय आम्ही घेऊ, असेही शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, कालच देसाई यांनी भाजपच्या दोन मंत्र्यांवरही बोचरी टीका केली होती. पाटण दौऱ्यात असताना त्यांनी नाव न घेता मंत्री गणेश नाईक आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला होता.
हेही वाचा
आणखी वाचा







