
India Maldives Row : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदीवमधील संबंध ताणले गेले आहेत. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यावर त्यात आणखी भर पडली आहे. मालदीव सरकारने तिन्ही मंत्र्यांना निलंबित करून वाद कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी, हा वाद वाढत असल्याचेच चित्र आहे. दरम्यान, मालदिवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चीन दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांचे सुर पालटले आहेत. त्यांनी भारताला धमकी वजा इशारा दिला आहे. मुइजू म्हणले, ‘आम्ही लहान असू, पण आम्हाला धमकावण्याचा परवाना मिळत(भारत) नाही, असे त्यांनी भारताचे नाव न घेता म्हटले आहे.








