
अभिराम करणार लीलाचा स्वीकार?
मात्र, अभिराम देखील हट्टाला पेटून मी आईला आणायला जाणार नाही, असा निर्णय आधी घेतो. परंतु, आई शिवाय करमत नसल्याने तो आईला आणण्यासाठी लीलाच्या घरी पोहोचणार आहे. यावेळी देखील आजी सगळ्यांसमोर अभिरामला लीलाला मानाने घरी घेऊन जाण्याचं वचन मागणार आहे. तर, अभिराम लीलाला म्हणणार आहे की, ‘तुझ्यासारख्या फसव्या मुलीला माझ्या घरात जागा नाही. मात्र माझ्या आईच्या हट्टामुळे मला तुला घरी न्यावं लागणार आहे.’ आता अभिरामने लीलाला घरी नेण्याचं मान्य केल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या पुढच्या विधी पार पडणार की, नाही? अभिरामच्या घरात लीलाला घेतलं जाईल की नाही? हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.







