
महिपतच्या विरोधातील सगळे पुरावे गोळा करून ते कोर्टासमोर सादर करून, अर्जुननी आपल्या वडिलांना म्हणजेच प्रताप सुभेदार यांना निर्दोष सिद्ध केले आहे. तर, सन्मानानं तो त्यांना घरी देखील घेऊन आला आहे. आता सुभेदार कुटुंबातील सगळीच मंडळी अर्जुन तोंडभरून कौतुक करत आहेत. सायलीला देखील कौतुकाची थाप मिळत आहे. आता रविराज चैतन्यला घेऊन अर्जुन सुभेदारच्या घरी जाणार आहे. यावेळी रविराज अर्जुनची माफी मागून त्याला शाबासकीची थाप देणार आहे. तर, चैतन्य देखील रविराज यांचा असिस्टंट म्हणून अर्जुनच्या घरी पोहोचणार आहे.








