अर्जुन आणि चैतन्यला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार सायली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय होणार?

0
2
अर्जुन आणि चैतन्यला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार सायली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय होणार?


मात्र, याप्रसंगी तो सतत चैतन्यचं नाव घेणे टाळतो. अर्जुनला चित्रपटाचे नाव आठवत नाहीये, हे बघून चैतन्य पटकन पुढे येऊन चित्रपटाचे नाव सांगतो. सायली हे बघून मनोमन सुखावून जाते. आता सायली आपल्या हातातला माईक चैतन्यच्या हातात देऊन, त्याला अर्जुनच्या शेजारी उभा करते आणि तुम्ही दोघे मित्र मिळून आम्हाला तुमच्या कॉलेजच्या गमतीजमती सांगा, असं म्हणते. दुसरीकडे, साक्षी आतमध्ये येऊन अर्जुन आणि चैतन्यला एकत्र बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन आणि चैतन्याची पुन्हा मैत्री होणे म्हणजे तिच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे साक्षी पुन्हा एकदा नवी शक्कल लढवायला सुरुवात करते.



Source link