
केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, जामिनाच्या प्रश्नावर पूर्णपणे विचार करण्यात आलेला नाही, परंतु पीएमएलच्या कलम १९ च्या नियमंचा विचार करण्यात आला आहे. कलम १९ आणि कलम १५ मधील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. जोपर्यंत मोठे खंडपीठ निर्णय घेत नाही तोपर्यंत केजरीवाल यांची अंतरिम जामिनावर सुटका करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. निकाल देताना न्यायाधीशांनी असेही सांगितले की, केजरीवाल यांना ९० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले आहे.








