
काय प्रकरण आहे नेमकं प्रकरण?
मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकातील या लेखकाने या तक्रारीबद्दल बोलताना सांगितले की, ‘मी २०१०मध्ये कथा लिहायला सुरुवात केली आणि २०१८ मध्ये मी त्यासंदर्भात एक पोस्टर पोस्ट केले. यानंतर, मी माझ्या लिंक्डइन पोस्टवरून एडी डायरेक्टर सुखदास सूर्यवंशी यांच्याशी करार केला. त्यांनी मला मुंबईला बोलावले आणि स्क्रिप्टही आणायला सांगितले. माझ्याकडे पूर्ण चॅट आणि मेसेजेस आहेत. त्यांनी मला सांगितले की, ते माझी आमिर खानशी ओळख करून देतील. पण, त्यावेळी काही कारणास्तव मी त्यांना भेटू शकलो नाही. मात्र, मी त्यांना कथा दिली आणि स्क्रीन रायटर्स असोसिएशनमध्ये नोंदणी केली.’






