
अंतरांची अंगठी परत घेण्यासाठी अभिराम लीलाला सतत फोन करत राहतो. मात्र, लीला त्याचा फोन उचलणे टाळते. लीला फोन उचलत नसल्याने अभिरामच्या रागाचा पार आणखीनच वाढणार आहे. दुसरीकडे, लीला अभिरामला टाळत आहे. ‘आता या अंकलचं माझ्याकडे काय काम?’, असं म्हणत ती सतत अभिरामचा फोन कट करत आहे. इतक्यातच तिला एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी फोन येतो. त्यामुळे आता लीला घरी खोटं बोलून या जाहिरातीच्या शूटिंगसाठी निघून जाणार आहे. तर, लीला शूटिंगसाठी गेल्यावर आता अभिराम तिच्या घरी येऊन धडकणार आहे.







