
आदित्यने बाबा म्हणायला नकार दिल्याने हर्षवर्धन चिडला
हर्षवर्धन सावनीला भेटायला गोखलेंच्या घरी आलेला असतो. तेवढ्यात आदित्य तेथे येतो आणि हर्षवर्धन त्याला मला पप्पा म्हण असे सांगतो. त्यावर आदित्य मी फक्त माझ्या सागर पप्पांना पप्पा म्हणणार असे बोलतो. ते ऐकून हर्षवर्धनला राग येतो. तो सावनीवर चिडतो, आपल्याला जे होण्याची भीती वाटत होती आता तेच होताना दिसत आहे. हर्षवर्धनने सावनीला म्हणतो की, “तुझे आदित्यकडे काहीच लक्ष नाही. आदित्य हा सागरच्या जवळ जात आहे. त्याने मला पप्पा म्हणून हाक मारण्यास नकार दिला. असेच सुरू राहिले तर तोही दुरावेल. आपल्या हातात काहीच राहणार नाही.” त्यावर सावनी हर्षवर्धनला समजावते. तू मूड खराब करु नकोस, मी समजावते त्याला असे ती बोलते.
वाचा: गौरव मोरेचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट कसा आहे? जाणून घ्या प्रेक्षकांकडून







