
२०२०मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडल्यानंतर गुरचरण सिंह याला त्याचे पैसे मिळाले नव्हते, असे अनेकांनी म्हटले होते. याबद्दल निर्माते असित कुमार मोदींना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ‘असे काही नव्हते. तो काळ कोरोनाचा होता, आणि तो आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय तणावपूर्ण होता. त्या काळात शूटिंगही थांबलं होतं. शो सुरू राहील की, नाही याची देखील शाश्वती नव्हती. आपल्या आजूबाजूचे जग बदलत होते. सर्वांसाठी हा कठीण काळ होता. मात्र, आम्ही सगळ्यांचे पैसे देण्याचा प्रयत्न केला होता.’








