
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनीने पाहिलेले एक स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसत आहे. तिला कित्येक वर्षांपासून हर्षवर्धनशी लग्न करायचे असते. मात्र, हर्षवर्धन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते टाळत असतो. आता अखेर मिहिरने मागणी घातल्यानंतर हर्षवर्धन लग्नाला तयार झाला आहे. पण त्याला सावनीशी लग्न करायचे नाही. त्यामुळे त्याचा मित्र आणि तो नवा प्लान आखतो. आता हर्षवर्धन त्याच्या प्लानमध्ये यशस्वी होणार का? हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.







