
अर्जुन आणि चैतन्य यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता रविराजही सायलीची साथ देणार आहे. रविराज घरी येऊन प्रिया आणि नागराजला घडला प्रकार सांगणार आहे. तर, प्रिया आणि नागराज मनातून आनंदून जाणार आहेत. मात्र, आता रविराज त्यांना आपण अर्जुन आणि चैतन्यची केस लढणार असल्याचं सांगणार आहे. मी अर्जुन आणि चैतन्य यांना सपोर्ट करत आहे, असं तो प्रिया आणि नागराज यांना सांगणार आहे. हे ऐकल्यानंतर आता प्रिया आणि नागराज यांचं टेन्शन देखील वाढणार आहे. एकीकडे दोघे मिळून अर्जुनच्या अडचणी वाढवत असताना, आता रविराज त्यांच्या बाजूने झाला, तर आपल्याला सगळं काहीही सोडावे लागेल, असं त्यांना वाटत आहे.








