
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांना विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते. पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला देहदंड स्वीकारावा लागला. मातापित्याच्या देहत्यागानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही मुक्ताबाईंवर पडली होती. तिने आईच्या निसर्गदत्त भावनेने ती पेलली. त्यांचा हा संपूर्ण प्रवास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर रुपेरी पडद्यावर दाखवणार आहेत. त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.







