
मला आनंद वाटतोय की, एक खरा संघर्ष माझ्या लेखणीमधून आणि निर्मितीमधून राज्यातील लोकांच्या पुढे येतोय, असं निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, ‘या चित्रपटातून एक रुपया देखील कमवणे हा माझा हेतू नाही. उलट मला आनंद होईल की, या चित्रपटाचा जेवढा जास्तीत जास्त व्यवसाय होईल, तो सर्व समाजाला मदत म्हणून जाहीर करतोय. सर्वांनी जरांगे पाटील यांचा संघर्ष पुढे यावा आणि ह्या लढ्याला अजून ताकद मिळावी या अनुषंगाने महाराष्ट्रामधील लोकांनी करोडो संख्येने संघर्षयोद्धा चित्रपट पहावा. त्याचबरोबर या चित्रपटातून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी आम्ही घेतली आहे. पण, तरी देखील जर काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी निर्माता म्हणून सर्वांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.’







