
दोन दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीत जाऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर काल अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप केले होते. सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या घोटाळ्याच्या विरोधातही आवाज उठवावा आणि ईडी चौकशीची मागणी करावी, असं अनिल परब म्हणाले होते. तसंच, येत्या काळात रामदास कदम यांचे १२ ते १३ घोटाळे बाहेर काढू, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज परब यांच्याच रिसॉर्टवर कारवाई झाली आहे.







