
मामाने दिले आशीर्वाद!
पापाराझींशी संवाद साधताना कृष्णा अभिषेक म्हणाला की, मामाच्या येण्यामुळे आम्ही सगळेच खूप आनंदी झालो आहोत. आम्ही मामाच्या पाया पडून त्याचे आभार मानले. तर, कश्मिराने बोलताना सांगितले की, गोविंदा मामाने त्यांच्या दोन्ही मुलांची भेट घेतली आणि त्यांना आशीर्वाद दिला. यामुळे ती देखील खूप खूश आहे. कृष्णाच्या दोन मुलांच्या जन्मादरम्यान कुटुंबात मोठा वाद झाला होता. भांडणानंतर, कृष्णाने आपल्या दोन मुलांना आशीर्वाद देण्यासाठी अनेक वेळा आपल्या मामा आणि मामीना बोलावले. परंतु, वाद इतका वाढला की, कोणीही कोणालाही भेटू शकले नाही. आता आरतीचे लग्न कुटुंबासाठी शुभ ठरले आहे आणि गोविंदाने कृष्णा-काश्मिराच्या दोन मुलांची पहिल्यांदा भेट घेतली आणि त्यांना आशीर्वाद दिला आहे.








