
गंगेत उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला!
पंडित बनायला गेलेल्या कैलाश खेर यांचे साथीदार त्यांच्यापेक्षा खूपच लहान होते. त्यांचे विचारही सहकाऱ्यांशी जुळत नव्हते. त्यामुळे ते मनातून निराश झाले होते. प्रत्येक गोष्टीत ते सतत अपयशी ठरत होते, त्यामुळे एके दिवशी त्यांनी गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी गंगा घाटावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याला वाचवले. कैलाश खेर यांना वाचवणाऱ्या व्यक्तीने त्यांना विचारले की, पोहता येत नसताना नदीत उडी का मारली? त्यानंतर कैलाशजींनी आपले दु:ख त्या व्यक्तीला सांगितले. हे कळताच त्या व्यक्तीने कैलाश खेर यांच्या डोक्यात टपली मारली. त्या टपलीने कैलाश खेर यांना जीवनाचे मूल्य शिकवले.








