
आजी अभिरामची माफी मागणार!
तर, हे लग्न कसं मोडलं या मागचं सत्य सांगताना लीला म्हणते की, ‘आजी हे लग्न अभिरामने मोडलेलं नाही. हे लग्न मलाच करायचं नव्हतं. त्यामुळे मी मेहंदी सोहळ्यातून पळ काढला होता. मात्र, मी लग्न मोडलं तर सगळे मला दोष देतील आणि मावशी आई चिडेल, म्हणून अभिरामने खोटं बोलून माझ्याशी लग्न मोडलं’, असं लीला आजीला सांगते. हे लग्न अभिरामने नाही मोडलं, तरीही आपण अभिरामलाच दोष दिला, त्याला वाईटसाईट बोललो हे कळल्यानंतर आजीला देखील वाईट वाटतं. यानंतर आजी अभिरामची माफी मागते. मात्र, लीला आणि आजीमध्ये आता छान मैत्री होणार आहे. त्या मैत्रीची निशाणी म्हणून आजी लीलाला अंतराची एक साडी देऊ करणार आहे. आता या साडीवरून काय रामायण घडणार, हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.







