माझ्या हिश्श्याचे किस्से: उच्चायुक्त म्हणाले… ‘रफी साहेबांसाठी दूतावास कधीही बंद होऊ शकत नाही’

0
20
माझ्या हिश्श्याचे किस्से: उच्चायुक्त म्हणाले… ‘रफी साहेबांसाठी दूतावास कधीही बंद होऊ शकत नाही’


  • Marathi News
  • Opinion
  • Rumi Jafri Divya Marathi Special Article | High Commissioner Said Embassy Can Never Be Closed For Rafi Saheb’

रूमी जाफरीएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

मोहम्मद रफी यांनी ‘शरारत’मधील ‘अजब है दास्तां तेरी ए जिंदगी’ या गाण्याला आवाज दिला आहे. विशेष म्हणजे, या गाण्यात किशोरकुमार यांनी अभिनय केला आहे.

ध्वजवंदन झाले, राष्ट्रगीत गायले गेले. सगळा कार्यक्रम झाल्यावर उच्चायुक्तांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालय उघडण्यास सांगितले. ते फरहानाला घेऊन गेले आणि भारताचा व्हिसा बनवून दिला. मग पासपोर्ट दाखवला आणि म्हणाले, ‘हे बघ फरहाना, हा एकमेव असा पासपोर्ट आहे, ज्याला १५ ऑगस्टला व्हिसा मिळाला आहे.’

मित्रांनो, रफी साहेबांविषयीच्या जीवनाशी संबंधित, त्यांच्या चांगुलपणाच्या, दयाळूपणाच्या, चांगल्या कामाच्या अनेक गोष्टी तुम्ही वाचल्या-ऐकल्या असतील. या गोष्टी आपल्यासाठी त्यांच्या अविस्मरणीय कहाण्या ठरल्या आहेत. पूर्वजांच्या कर्माचे फळ पुढच्या पिढ्यांना मिळते, असे म्हणतात ते खोटं नाही. रफी साहेबांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या चांगुलपणाचे फळ त्यांच्या कुटुंबाला लाभले. आज मी अशीच एक घटना तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

यास्मिन हमीद रफी आणि फौजिया हमीद रफी या रफी साहेबांच्या सुना. त्या सलीम खान साहेबांच्या मोठ्या बहिणीच्या मुली आहेत. दोघीही लंडनमध्ये राहतात, इंग्लंडच्या नागरिक आहेत. काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मित्र संजीव सरन यांच्या घरी गेलो होतो, तेव्हा मला यास्मिन रफी भेटल्या. त्यांना सर्व जण डॉली बाजी म्हणत होते आणि त्यांची मुलगी फरहानाही तिथे होती. आपण आपल्या आयुष्यात सासरे रफी साहेब यांच्यापेक्षा जास्त धार्मिक आणि उदात्त व्यक्ती कधीही पाहिली नाही, असे डॉली बाजी यांनी मला सांगितले. जगात रफी साहेबांविषयी किती आदर आहे, याचे एक उदाहरण त्यांनी मला सांगितले.

त्या म्हणाल्या, ‘मी भारतात येण्याचा बेत आखला होता. माझी मुलगी फरहानालाही सोबत चल असं म्हणाले तेव्हा तिने नकार दिला. माझा भारताचा व्हिसाही बनवला होता. पण, माझ्या फ्लाइटच्या एक दिवस आधी फरहानाने, आपल्यालाही मुंबईला यायचंय, असं सांगितलं. मी म्हणाले की, आता उद्या रात्रीची फ्लाईट आहे, भारताचा व्हिसा एका दिवसांत कसा मिळणार? तर ती म्हणाली, की उद्या सकाळी मी दूतावासात जाईन, उच्चायुक्तांना भेटेन आणि व्हिसा बनवून घेईन. फ्लाइट तर उद्याची आहे.’

डॉली बाजी सांगत होत्या.. ‘दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून फरहानाने दूतावासात धाव घेतली. तिथे गेल्यावर दूतावासाच्या बाहेर कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचे तिला दिसले. बरेच लोक येऊन बसले होते. ती पुढे गेली आणि आपल्याला उच्चायुक्तांना भेटायचे आहे, असे सांगितले. तर आज १५ ऑगस्ट असल्यामुळे दूतावास बंद असल्याचे तिला सांगण्यात आले. उच्चायुक्त येतील, ध्वजवंदन आणि नंतर गेट-टूगेदर होईल, मग ते निघून जातील. त्यामुळे आज भेट होणे अशक्य आहे. व्हिसा तर अजिबात बनू शकणार नाही.. हे ऐकून फरहाना निराश झाली. ध्वजवंदनासाठी जे भारतीय आले होते, त्यांच्यासोबत तीही तेथे बसली.’

‘उच्चायुक्त आले आणि थेट ध्वजवंदनासाठी ध्वजाच्या दिशेने निघाले. फरहानाही पुढे गेली आणि उच्चायुक्तांना म्हणाली ‘माफ करा सर, मला आज भारतात जायचे आहे. मला व्हिसा मिळाला तर बरं होईल.’ त्यावर उच्चायुक्त म्हणाले, ‘तुम्ही भारतीय असाल, तर तुम्हाला आज स्वातंत्र्यदिन आहे, हे कळायला हवे. आम्ही येथे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आलो आहोत. आज ऑफिसचे काम होणार नाही, आज सुटी आहे..’ एवढं बोलून ते पुढे निघून गेले. मग फरहाना म्हणाली, “सर, मी कोण आहे, हे तुम्हाला सांगायचंय…’

उच्चायुक्त तिला चिडवत म्हणाले, ‘सांग बरं तू कोण आहेस..?’ यावर फरहाना म्हणाली, ‘मी मोहम्मद रफी यांची नात आहे.’ हे ऐकून उच्चायुक्त आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, ‘कोण मोहम्मद रफी, महान गायक?’ फरहानाने उत्तर दिले, ‘हो.’ उच्चायुक्त चालत जवळ आले आणि फरहानाचा हात हाती घेत म्हणाले, ‘तू अशा व्यक्तीचे नाव घेतले आहे, ज्यांच्यासाठी भारतीय दूतावास कधीही बंद राहू शकत नाही..’

त्यानंतर प्रथम ध्वजवंदन झाले, राष्ट्रगीत गायले गेले. सगळा कार्यक्रम झाल्यावर उच्चायुक्तांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालय उघडण्यास सांगितले. ते फरहानाला घेऊन गेले आणि भारताचा व्हिसा बनवून दिला. मग पासपोर्ट दाखवला आणि म्हणाले, ‘हे बघ फरहाना, हा एकमेव पासपोर्ट आहे, ज्याला १५ ऑगस्टला व्हिसा मिळाला आहे.’ मी तुम्हाला आणखी एक घटना सांगतो जी अमिताभ बच्चन यांनी माझ्यासोबत शेअर केली. हा किस्सा त्यांच्याच शब्दांत ऐका…

“आम्ही कलकत्त्याला शो करायला गेलो होतो. एके दिवशी आमचा रफीसाहेबांसोबत शो होता. दुसऱ्या दिवशी किशोरकुमार साहेबांसोबत शो होता. रफी साहेबांसोबतचा आमचा शो खूप यशस्वी झाला. रफीसाहेब दुसऱ्या दिवशी विमानतळाकडे रवाना झाले. त्या दिवशीचा शो किशोरकुमार साहेबांसोबत होता आणि अचानक मुंबईहून बातमी आली की, त्यांची फ्लाइट चुकली आहे, आता ते येऊ शकत नाहीत. त्या काळात फक्त दोनच उड्डाणे व्हायची. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की, शोमध्ये गायक नसेल, तर शो कसा होणार? रफी साहेब विमानतळावर गेले होते. आम्ही लगेच गाडीत बसून एअर पोर्टकडे धावलो. तोपर्यंत रफीसाहेब फ्लाइटमध्ये बसलेही होते. त्या काळात सुरक्षेचा इतका त्रास नव्हता. त्यामुळे मी ताबडतोब फ्लाइटच्या आत गेलो आणि रफीसाहेबांना सगळा प्रकार सांगितला. त्यांना विनंती केली की, आता ही वेळ फक्त तुम्हीच सांभाळून घेऊ शकता. कृपा करुन तुम्ही थांबा! रफीसाहेबांनी क्षणभरही विचार केला नाही. ते लगेच विमानातून उतरले.

असं म्हणतात की, माणूस निघून गेला तरी त्याचे शब्द मागे राहतात. रफी साहेबांसाठी एक प्रसिद्ध शेर आहे… चाल वो चल कि पस-ए-मर्ग तुझे याद करें,

काम वो कर कि ज़माने में तेरा नाम रहे।
तुम्हाला जगात कलाकारांचे चाहते आढळतील, पण रफी साहेबांचे फक्त भक्तच सापडतील. रफी साहेबांनी त्या काळातील प्रत्येक अभिनेत्याला आपला आवाज दिला. पण, अशाच एका अभिनेत्यालाही त्यांनी आपला आवाज दिला, जो स्वतः एक उत्तम गायक होता. ते होते किशोरकुमार. चित्रपटाचे नाव ‘शरारत’ आणि गाणे आहे…
अजब है दास्तां तेरी ए जिंदगी…
स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.

रूमी जाफरी
बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक



Source link